शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळणार

अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करण्याचे निर्देश

• दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान; सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित

• शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्दरितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश • यासंदर्भात प्रशासनाने युद्धस्तरावर काम करण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या सूचना

• प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश

• बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याच्या एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे मंत्रिमंडळाचे निर्देश

Leave a comment